रत्नागिरीची चिंता वाढली; जिल्हयात करोनाचे २२८ रूग्ण, ७ जण आयसीयूत तर १० ऑक्सिजनवर

रत्नागिरी: कोरोनाच्या जिल्हयात तिसऱ्या लाटेतील रूग्णसंख्या गेले दोन दिवस वाढत असल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे आवश्यक ती काळजी घेणे आवश्यक आहे. २०जानेवारी रोजी गुरुवारी सायंकाळी उशिरा प्राप्त झालेल्या अहवालात रत्नागिरी जिल्ह्यात २२८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून आयसीयूमध्ये एकूण सात रुग्ण उपचार घेत आहेत तर दहा रुग्णांना ऑक्सिजन सुरु आहे. याचवेळी बरे होत असलेल्या रुगांचे प्रमाणही चांगले असून आज २०४ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.४१ टक्के इतके आहे. (in ratnagiri district there are 228 corona patients 7 in icu and 10 on oxygen) १८०७ जणांच्या स्वॅब तपासणीत हा अहवाल आला आहे. जिल्ह्यात सध्या १२७५ जणांवर कोरोनाचे उपचार सुरु आहेत.जिल्हयात सर्वाधिक म्हणजे ८२रूग्ण रत्नागिरी तालुक्यात असून त्यापाठोपाठ चिपळूण मध्ये ६२ रुग्णांची नोंद झाली आहे. उर्वरित तालुक्यातील आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. खेड ३३, मंडणगड ८, दापोली २३, गुहागर १२, चिपळूण ६२, संगमेश्वर १६, रत्नागिरी ८२, लांजा ८ याप्रमाणे आहे. नव्या २२८ रुग्णांमुळे जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण बाधित रुग्णांची संख्या ८२१५५ असून त्यातील ७८३८५ जणांनी कोरोनावर मात केली. २४ तासात एकाही बाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही मात्र आतापर्यंत २४९५ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात १२७५ जणांवर कोरोनाचे उपचार सुरु आहेत. त्यातील १००५ रुग्ण गृह विलगिकरणामध्ये उपचार घेत आहेत. हे प्रमाण ७८.८२% इतके आहे.
from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/3Ip0IQT
https://ift.tt/3FJhmZL
No comments