जिल्हा रुग्णालयातून तब्बल १३ ड्युरा सिलेंडर गायब; भाजप नेत्याच्या आरोपाने खळबळ

रत्नागिरी: करोनाच्या ऐन तिसऱ्या लाटेत रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय चर्चेत आले आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्याकडून गंभीर आरोप झाल्यामुळे हे रुग्णालय वादात सापडण्याची चिन्हे आहेत. (as many as 13 dura cylinders went missing from bjp leader alleged) रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात लाखो रुपये खर्च करुन घेतलेले तब्बल तेरा ड्युरा सिलेंडरचा गोलमाल उघडकीस आल्याचा खबळजनक आरोप भाजपा युवा मोर्चाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष यांनी केली आहे. हे सिलेंडर नेमके गेले कोठे?, याचा शोध लागणे गरजेचे असून या सगळयाला जे जबाबदार आहेत त्यांच्यावर आणि जिल्हा शल्य चिकित्सकांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी पटवर्धन यांनी केली आहे. तसेच ज्यांनी कोरोना काळात ऑक्सिजन पुरवठा जिल्हाभरात केला त्यांची लाखो रुपयांची बीलेही अडकवून ठेवण्यात आल्याचाआरोपही त्यांनी केला आहे.  ते पुढे म्हणाले की, जिल्हा रुग्णालय हे नेहमीच चर्चेत राहिले आहे. या रुग्णालयाचा कारभार सर्वश्रूत आहे. मात्र असे असतानादेखील काम करणार्‍या अधिकार्‍यांना बाहेरचा रस्ता दाखविला जातो, बिनकामाचे अधिकारी येथील लोकप्रतिनिधी प्रिय असल्याने याचाच फायदा घेत जिल्हा रुग्णालयात करोना काळात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहारदेखील झाले आहेत. ज्यांनी कोरोना काळात ऑक्सिजनचा पुरवठा केला त्या पुरवठादाराची लाखो रुपयांची बिले जाणूनबुजून अडकवून ठेवली आहेत. हे बिल अडकवून ठेवण्याचे कारण काय? केवळ मलिदा मिळावा यासाठीच कोरोनामध्ये काम करणार्‍या अनेक आस्थापनांची बिले जिल्हा रुग्णालयाने मुद्दामहून अडकवून ठेवली आहेत असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.  आता तर १३ ड्युरा सिलेंडरचा गोलमाल पुढे आला आहे. हे सध्या आहेत कुठे? एका सिलेंडरची किंमत अडीच ते तीन लाख रुपये इतकी आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून हे तेराही सिलेंडर जिल्हा रुग्णालयाच्या ताब्यात नाहीत. यामागचा गोलमाल काय? असा सवाल अनिकेत पटवर्धन यांनी उपस्थित केला आहे.  ज्यावेळी ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते त्यावेळी या ड्युरा सिलेंडरचा वापर होत असतो, मात्र हे तेरा सिलेंडर सध्या गायब आहेत. स्वत:ची मान वाचवण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक सर्व जबाबदारी कर्मचार्‍यांवर ढकलत आहेत. खरं तर याप्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी, जिल्हा शल्य चिकित्सकांवर कारवाई करावी, अशी मागणीही भाजपा युवा मोर्चाचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी केली आहे. या सगळ्या गंभीर आरोपांनंतर आता रत्नागिरी जिल्हाप्रशान कोणती भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/34ZTrIT
https://ift.tt/3GV5PYP

No comments

Powered by Blogger.