सर्वोच्च न्यायालयाच्या संरक्षणानंतरही पोलिसांनी नितेश राणेंची गाडी का अडवली, वाचा नेमकं काय घडलं?

सिंधुदुर्ग: संतोष परब हल्लाप्रकरणात सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने भाजप आमदार यांना जामीन फेटाळल्यानंतर कोर्टाबाहेर जोरदार राडा होताना दिसला. सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून १० दिवसांचे संरक्षण देऊनही पोलिसांनी नितेश राणे () यांची गाडी अडवल्याने राणे समर्थक आक्रमक झाले होते. नितेश यांचे ज्येष्ठ बंधू निलेश राणे हेदेखील पोलिसांवर प्रचंड संतापले होते. तुम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करत आहात. कोणाच्या आदेशावरुन तुम्ही नितेश राणे यांना अडवत आहेत, असा सवाल निलेश राणे यांनी पोलिसांना विचारला. मात्र, सरकारी वकील प्रदीप घरत यांनी पोलिसांच्या या कृतीचे समर्थन केले. सत्र न्यायालयाने नितेश राणे यांना कोर्टाच्या परिसराबाहेर जाण्यासाठी जामीन किंवा लेखी परवानगी दिली नव्हती. नितेश राणे न्यायालयाच्या कस्टडीत आले होते. त्यांच्या शरणागतीवर लेखी हुकूम करावा, असा आमचा आग्रह होता. त्यामुळे सुनावणी संपल्यानंतर या मुद्द्यावर पुन्हा युक्तिवाद झाल्याचे प्रदीप घरत यांनी म्हटले. तसेच सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणे यांना कोर्टासमोर शरणागती पत्कारायला १० दिवसांची मुदत दिली होती, ते अटकेपासून संरक्षण नव्हते. त्यामुळे नितेश राणे जेव्हा कोर्टासमोर हजर झाले तेव्हाच ही मुदत संपली. त्यामुळे आता नितेश राणे यांना अटक करायची किंवा नाही, याचा निर्णय पोलीस घेतील. तसेच आम्हीही यावर विचारविनिमिय करुन निर्णय घेऊ, असे प्रदीप घरत यांनी म्हटले. नितेश राणे यांनी सत्र न्यायालयात शरण अर्ज दाखल केला नव्हता त्यामुळे त्यांना अटक करता येणार नाही, असे न्यायमूर्तींनी म्हटले. त्यामुळे नितेश राणे यांनी रितसर शरण जावे व न्यायालयाने शरणागती स्वीकारावी, असे आमचे म्हणणे होते. जामीन अर्ज फेटाळाला गेल्यानंतर नितेश राणे यांना ताब्यात घ्यावे, असा युक्तिवाद आम्ही केला. पण न्यायालयाने आमचा युक्तिवाद मान्य केला नाही. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना १० दिवसांची मुदत दिल्याने अटक करता येणार नाही, असे सत्र न्यायालयाचे म्हणणे आहे. त्यानुसार आता नितेश राणे यांना कोर्टाबाहेर जाऊन देण्यात आले आहे. आता आम्ही यावर चर्चा करुन पुढील निर्णय घेऊ, असे सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितले. पोलिसांची दादागिरी, सर्वोच्च न्यायलयाचा अवमान; नितेश राणे यांच्या वकिलांचा दावा पोलिसांनी नितेश राणे यांची गाडी अडवल्यामुळे त्यांचे वकील संतप्त झाले. पोलीस दादागिरी करत आहेत. त्यांना कोणत्याही परिस्थितीत नितेश राणे यांना अटक करायची आहे. मात्र, तसे घडणार नाही. पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याचेही नितेश राणे यांच्या वकिलांनी म्हटले.


from Sindhudurg News | सिंधुदुर्ग बातम्या | Sindhudurg News in Marathi | Sindhudurg Local News - Maharashtra Times https://ift.tt/Yd1cxJE8q
https://ift.tt/uYsXf65Eo

No comments

Powered by Blogger.