Disha Salian: नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली, मग धमकीचा आरोप कसा लावलात; भाजपचा सवाल

सुरेश कोलगेकर, सिंधुदुर्ग: प्रकरणात मुंबई पोलिसांनी भाजपचे केंद्रीय मंत्री यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. येत्या ४ तारखेला त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्सही बजावण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आता भाजप नेत्यांकडून नारायण राणे () यांची पाठराखण केली जात आहे. भाजप आमदार प्रसाद लाड () यांनी नारायण राणे यांच्यावर धमकी दिल्याचा गुन्हा कसा काय दाखल केला जाऊ शकतो, असा सवाल उपस्थित केला आहे. ते बुधवारी सिंधुदुर्गात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी प्रसाद लाड यांनी म्हटले की, केंद्रीय मंत्री नारायण राणे व आमदार नितेश राणे याच्यावर ५०७ (२) चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या कलमात समोर चेहऱ्यावर धमकी देण्याचा आरोप होतो. पण पत्रकार परिषदेत जर एखादा विषय बोलतोय तर त्यामध्ये जीवे मारण्याचा आरोप कसा होऊ शकतो, असा सवाल प्रसाद लाड यांनी उपस्थित केला. महाविकास आघाडीचे सरकार भाजपच्या नेत्यावर खोटे गुन्हे व चुकीचे पध्द्तीने गुन्हे दाखल करत आहेत. वेगवेळ्या पध्दतीने दबाव आणून आमचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण आम्ही सरकारला घाबरत नाही. कुठल्याही परिस्थतीती संघर्ष करू व सत्यासाठी लढू, असे प्रसाद लाड यांनी म्हटले. ईडी ,एनआयए या केंद्रीय यंत्रणा देशहितासाठी काम करतात. महाविकासआघाडीच्या नेत्यांनी केंद्रीय यंत्रणेकडे योग्य पुरावे द्यावेत, त्यानुसार कारवाई होईल. प्राजक्ता तनपुरे यांच्यावर आर्थिक गुन्हे शाखेच्या तक्रारीनुसार चौकशी होऊन गुन्हा दाखल झाला. राज्याच्या यंत्रणेने प्रथम कारवाई केली. त्यानंतर ईडीने कारवाई केली, याकडे प्रसाद लाड यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. नारायण राणे आणि नितेश राणे यांना चौकशीसाठी समन्स मुंबई पोलिसांनी नारायण राणे आणि नितेश राणे () या पितापुत्रांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पाठवले आहे. नितेश राणे यांना ३ मार्च आणि नारायण राणे यांना ४ मार्च रोजी सकाळी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. याठिकाणी पोलीस दोघांचाही जबाब नोंदवून घेतील. त्यामुळे आता चौकशीतून काय निष्पन्न होणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय यंत्रणांकडून महाविकासआघाडीतील नेते आणि मंत्र्यांवर कारवाई सुरु आहे. या पार्श्वभूमीवर आता ठाकरे सरकारनेही भाजपला प्रत्युत्तर देण्यासाठी हालचाली सुरु केल्याची चर्चा होती. त्यामुळे आता राणे पिता-पुत्र ठाकरे सरकारचं पहिलं टार्गेट ठरणार का, हे पाहावे लागेल.
from Sindhudurg News | सिंधुदुर्ग बातम्या | Sindhudurg News in Marathi | Sindhudurg Local News - Maharashtra Times https://ift.tt/Ha9jJPZ
https://ift.tt/JOcHXsj
No comments