storm in ratnagiri: रत्नागिरीला वादळाचा मोठा तडाखा; घरे, गोठयांसह आंबा, काजू, नारळाच्या झाडांचे नुकसान

वादळाचा तडाखा बसलेल्या गावांमध्ये राजापूर तालुक्यातील रायपाटण, पाचल आदी गावांचा सामावेश आहे. सायंकाळी वादळी वारे वाहू लागले. काही क्षणातच वादळी वाऱ्याचे रूपांतर चक्रीवादळ सदृष्य परिस्थितीत झाले व क्षणार्धात अनेक ठिकाणी होत्याचे नव्हते झाले. या वादळात अनेकांच्या घरावर मोठमोठी झाडे उन्मळून पडली. त्यांमध्ये घरांचे आतोनात नुकसान झाले. वादळात घरांवरील कौले पत्रे उडाली. तर, पाचलमधील होळीच्या मांडावर देखील पडझड झाल्याची घटना घडली.

from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/OK9enp4
https://ift.tt/eGhgzQk

No comments

Powered by Blogger.