उदय सामंत रत्नागिरी, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. त्यात उदय सामंत यांच्याकडे रत्नागिरी आणि रायगद जिल्हाचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी सोपविली आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. तसेच नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल. इतर पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे - राधाकृष्ण विखे पाटील - अहमदनगर व सोलापूर, सुधीर मुनगंटीवार- चंद्रपूर व गोंदिया, चंद्रकांत दादा पाटील - पुणे, विजयकुमार गावित - नंदुरबार, गिरीश महाजन - धुळे, लातूर व नांदेड, गुलाबराव पाटील - बुलढाणा व जळगाव, दादा भुसे- नाशिक, संजय राठोड - यवतमाळ व वाशिम, सुरेश खाडे - सांगली, संदिपान भुमरे - औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), तानाजी सावंत - परभणी व उस्मानाबाद (धाराशिव), रवींद्र चव्हाण- पालघर व सिंधुदुर्ग, अब्दुल सत्तार- हिंगोली, दीपक केसरकर -मुंबई शहर व कोल्हापूर, अतुल सावे - जालना व बीड, शंभूराज देसाई - सातारा व ठाणे, मंगलप्रभात लोढा - मुंबई उपनगर

No comments

Powered by Blogger.