'मी निवडणुकीचा पूर्णवेळ प्रचार केला असता तर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा निकाल वेगळा लागला असता'

सिंधुदुर्ग: मी सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या प्रचारात पूर्णवेळ देऊ शकलो असतो तर निकाल वेगळा लागला असता, असे वक्तव्य शिवसेना नेते यांनी केले. जिल्हा बँकेच्या पराभवाला मी जबाबदार असल्याचेही त्यांनी म्हटले. या निवडणुकीत यांचा विजय झाला असला तरी, उमेदवारांचे एकूण मतदान बघितले तर त्यात भाजप पिछाडीवर असल्याचे दिसून येते. जिल्हा बँकेतील सहा मतदार संघातील मतदानाची आकडेवारी पाहता आमच्या पॅनेलला एकुण २ हजार ४६७ मते मिळाली, तर भाजपच्या पॅनलला २ हजार ३२० मते मिळाली. भाजपच्या पॅनेलपेक्षा आमच्या पॅनेलला १४७ मध्ये जास्त मिळाली आहेत. तरीसुद्धा टेक्निकली आमचा पराभव झाला आहे. केवळ छोट्या मतदारसंघातील मतदारांना पैशाचे आमिष दाखवून मते फिरविण्यात आल्याने हा प्रकार घडला. अन्यथा हा निकाल वेगळा असता, असे दीपक केसरकर यांनी म्हटले. ते सोमवारी सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या एकूण १९ जागांपैकी ११ जागांवर भाजपचा विजय झाला होता. तर महाविकासआघाडीला ८ जागांवर समाधान मानावे लागले होते. सिंधुदुर्ग बँक आपल्या ताब्यातून जाणार, असे जेव्हा वाटले आणि दिल्लीवरून विचारणा होणार, या भीतीने भाजपच्या राज्यातील पक्षश्रेष्ठींकडून माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांना राणेंच्या दिमतीला पाठविण्यात आले. ऐनवेळी ही 'कुमक' मदतीला आल्याने नारायण राणे यांना विजय मिळवणे शक्य झाल्याचा दावाही दीपक केसरकर यांनी केला. राणेंचा विजय दणदणीत नव्हेच, शिवसेनेचा पलटवार सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील निवडणुकीतील भाजपचा विजय दणदणीत वगैरे नसल्याचेही शिवसेनेने म्हटले आहे. जिल्हा बँकेचा निकाल नारायण राणेकृत भाजपाच्या बाजूने लागला. १९ पैकी ११ जागांवर भाजपाच्या सिद्धिविनायक पॅनलने निर्विवाद बहुमत मिळविले. शिवसेनेसह महाविकास आघाडीस ८ जागा मिळवता आल्या. म्हणजे निवडणुकीत घासून टक्कर झाली व निसटता पराभव किंवा निसटता विजय झाला. तरीही भाजपाचे ‘पॅनल’ जिंकले. ११ विरुद्ध ८ हा निकाल. यास दणदणीत विजयही म्हणता येणार नाही व दारुण पराभवही म्हणता येणार नाही, असा युक्तिवाद 'सामना'तून करण्यात आला होता. एका जिल्हा बँकेवर विजय मिळवताच राज्यात सत्ता परिवर्तन होईल, अशी बोंब मारणे यास भाकडकथा नाही म्हणायचे तर दुसरे काय? मानगुटीवर बसलेली भुते उतरवणारे निष्णात लोकही त्याच कोकणात आहेत, हे काय भाजपावाल्यांना माहीत नाही का, असा सवाल सामनाच्या अग्रलेखातून विचारण्यात आला होता.
from Sindhudurg News | सिंधुदुर्ग बातम्या | Sindhudurg News in Marathi | Sindhudurg Local News - Maharashtra Times https://ift.tt/3zp8UNP
https://ift.tt/3JCuByL
No comments