National Water Award: दापोली नगरपंचायतीला 'राष्ट्रीयजल पुरस्कार' जाहीर; देशात दुसरा क्रमांक

दापोली: कोकणात रत्नागिरी जिल्हयात दापोली नगरपंचायतीचे नाव थेट राष्ट्रीय स्तरावर झळकले आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी शुक्रवारी 'राष्ट्रीय जल पुरस्कार - २०२०'ची घोषणा दिल्ली येथे केली आहे. दापोली नगरपंचायतीचा राष्ट्रीय पातळीवर दुसरा क्रमांक आला आहे. दापोली शहराला पाणीपुरवठा नारगोली धरणातील गाळ लोकसहभागातून काढण्याचे काम केले या सगळ्याची दखल थेट राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. या पुरस्कारांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली नगर पंचायतीने देशात दुसरा क्रमांक पटकाविला असून महाराष्ट्रात सोलापूर बार्शी तालुक्यातील सुर्डी नगरपंचायत तिसऱ्या क्रमाकांवर आहे. सध्या कोकणात महाड नगरपरिषदेत कार्यरत असलेले व दापोली नगरपंचायतीचे तत्कालीन मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्या संकल्पनेतून हा मोठा उपक्रम राबविण्यात आला होता. नगराध्यक्ष उल्का जाधव, परवीन शेख,उपनगराध्यक्ष प्रशांत पुसळकर व सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने हे लोकसहभागातून जलसंवर्धनाचे मोठे काम लोकसहभागातून करण्यात आले होते. धरणाला ४३ वर्षांचा इतिहास नारगोली येथील धरणाचे खोलीकरण,रुंदीकरण आदी कामे लोकसहभागातून एप्रिल, मे २०१९ मध्ये करण्यात आली होती. मागील २ वर्षे दापोली शहराची नियमित भासणारी पाणीटंचाई कमी झाली. खोलीकरणामुळे निघालेला गाळ, माती, मुरूम, खडक यापासून धरणाच्या भिंतीचे व भिंतीच्या पायाचे मजबुतीकरण करण्यात आले. यामुळे ४३ वर्षे जुन्या व दुर्लक्षित असलेल्या धरणाचे प्रथम एखाद्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेने लोकसहभागातून करणे हे पहिल्यांदाच घडले. पाणी टंचाईवर तर मात केलीच, त्याचबरोबर धरणाचेही मजबुतीकरण केले आहे. या कामाचे मेरी, नाशिक येथील धरण सुरक्षा संस्थेच्या पथकानेही लोकसहभागाचे कामाचेही कौतुक केले होते. पाणीटंचाईची झळ कमी झाली या धरणातून लोकसहभागातून धरणातील ७८६६० क्युबिक मीटर गाळ व माती काढण्यात आली. याद्वारे धरणाच्या पाणी साठ्यामध्ये ०.०७८ द.ल.घ.मी. पाणीसाठा वाढला आहे. यामुळे धरणाचा पाणीसाठा पूर्वी ०.३५ होता, तो आता एकूण ०.४३ एमसीएम (दशलक्ष घनमीटर) झाला आहे. वाढलेल्या पाण्यामुळेच शहरामध्ये एप्रिल व मेमध्ये किमान एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात आला. मालकीच्या दापोली शहरामध्ये नियमित भेडसावणाऱ्या पाणी टंचाईवर कायमस्वरूपी मात करण्याचा मोठा प्रयत्न झाला त्यामुळे यावर्षी किमान एकदीवसाआड शहराला पाणीपुरवठा करता आला. कोट्यावधी रुपयांची बचत धरणामध्ये खोलीकरण, रुंदीकरण, दगडी बंधारे, मातीची संरक्षक भिंत उभारणे, जमीन तयार करणे, ओढ्याचे रुंदीकरण, श्रमदान आदीचे अंदाजित मूल्य हे ३६९.६७ लाख होते. धरणाच्या कामाकरिता नगरपंचायतीने डंपर, इंधन व इतरकरिता एकूण लोकसहभागातून ३६.६३ लाख खर्च केला होता. शासनाच्या अलोरे येथील जलसंपदा विभागाने फक्त गाळ काढण्यासाठी १ कोटी ८३ लाख ०९ हजार ३०८ इतके अंदाजपत्रक दिले होते,मात्र या खर्चाची मोठी बचत झाली होती. नगरपंचायतीने लोकसहभागातून फक्त गाळच काढला नाही, तर धरणाचे खोलीकरण व रुंदीकरण केले. बंधारे व जमीन तयार केली आहे. यामुळे शासनाची सुमारे ३ कोटी इतक्या निधीची बचत केली आहे. परिसरातील ग्रामस्थांनाही झाला फायदा धरणाच्या खालील शेतकऱ्यांचे पुरामुळे होणारे नुकसान कमी झाले. तसेच नदीमध्ये बारमाही पाणी राहिल्यामुळे शेतीमध्ये दुबार पीक घेणे शक्य आहे. तसेच ग्रामीण पाणी पुरवठा योजनांमधील पाण्याची पातळी वाढली आहे. या कामातून स्फूर्ती घेत याच नदीवर या पुढे ग्रामस्थांनी लोकसहभागातून पाणी अडवण्यासाठी बंधारेही घातले.
from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/33bwm59
https://ift.tt/3F8QySD
No comments